>>>>चौफेर प्रतिनिधी नागपूर
राजकारण्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच रोखठोक बोलत संगळ्यांचीच पोलखोल करतात. विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्याने कोणालाही वाईट वाटत नाही, उलट आणखी व्यवस्थित काम करण्यास सुरुवात करतात. नागपूर येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी नेते व कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेत टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचारात बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लाथ, असेही बोललो.चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे.
हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे.
लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे असे वाटते. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.
गडकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, पैसे हे साधन नाही. माझे निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे यूट्यूबवर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले.
त्या गाण्याच्या रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगले काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळले नाही पाहिजे. पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

